Posts

Showing posts from April, 2026

मजरेवाडी गावचे सुपुत्र कै. सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचे दुःखद निधन.

Image
प्रतिनिधी -सोलापूर, दि. २४ एप्रिल २०२६  सोलापूर उत्तर तालुक्यातील मजरेवाडी गावचे मूळ रहिवासी तथा जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क, रेणुका नगरजवळील लंगोटे वस्ती येथे वास्तव्यास असलेले सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचे शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गत आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सिद्धार्थ तालीम संघातर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते तसेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे आणि मंडळाचे प्रमुख विनोद वाघमारे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्रिशरण पंचशील बुद्ध पूजेनंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान तथागत गौतम बुद्ध यांचा देखावा सादर करण्यात आला होता. या देखाव्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या मिरवणुकीत मंडळातील कार्यकर्ते, सभासद तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव अध्यक्ष कृष्णा कांबळे, उपाध्यक्ष गणेश लोंढे व सनी खळसुडे, कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, सचिव स्वप्निल सुरवशे, खजिनदार विशाल गायकवाड तसेच मिरवणूक प्रमुख उदय वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विश्वजित कसब...

डॉ. आंबेडकर क्रिकेट ट्रॉफी अंडर-१२ स्पर्धेला प्रारंभ; साऊथ सोलापूर आपटे ग्रुपची विजयी सलामी.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साऊथ सोलापूर आपटे ग्रुप आयोजित डॉ. आंबेडकर क्रिकेट ट्रॉफी (अंडर-१२) स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडले. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे निवड समिती सदस्य विक्रांत पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रणजी खेळाडू प्रवीण देशेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रशांत बाबर, दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच सुखद जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग नोंदविला असून साखळी पद्धतीने प्रत्येक संघ ४ सामने खेळणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण ३२ सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना साऊथ सोलापूर आपटे ग्रुप आणि युनायटेड क्रिकेट क्लब यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना साऊथ सोलापूर आपटे ग्रुपने ४५ षटकांत ६ बाद २६३ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. नील (६७) आणि तन्मय वाघमोडे (५७) यांच्या अर्धशतकांमुळे संघाला मजबूत धावसंख्या उभारता आली. २६४ धावांच्या लक्ष्...

सिईओ जैन यांनी घेतला माळशिरस पंचायत समितीचा आढावा

Image
प्रतिनिधी -सोलापूर  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज माळशिरस पंचायत समितीच्या विविध ध्वजांकित योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंचायत समिती परिसरात जिल्हा नियोजन समितीमार्फत उभारण्यात येत असलेल्या सोलार प्रकल्पाची पाहणी केली. तसेच माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीची पाहणी करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर तिरवंडी येथील प्राथमिक शाळेचीही पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे उपस्थित होते.

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात

Image
प्रतिनिधी – सोलापूर  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात भव्य आणि दिव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शहरातील विविध भागांतून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते तसेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे मंडळाचे प्रमुख विनोद दादा वाघमारे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील बुद्ध पूजेचे आयोजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.मिरवणुकीदरम्यान तथागत गौतम बुद्ध यांचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंडळातील कार्यकर्ते, सभासद तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे उत्सव अध्यक्ष कृष्णा कांबळे, उपाध्यक्ष गणेश लोंढे व सनी खळसुडे, कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, सचिव स्वप्निल सुरवशे, खजिनदार विशाल गायकवाड तसेच मिरवणूक प्रमुख उदय वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विश्वजीत कसबे, उत्तरेश्वर वाघमारे, नितीन वाघम...

ऑर्किड स्कूलची आरुषी उस्तुरगे सोलापुरात अव्वल; गुणवंतांचा उत्साहात सत्कार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सीबीएसई दहावी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती मा. सौ. रंजिता चाकोते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, विश्वस्त सोमनाथ करजगी, योगिनाथ करजगी, मोहिनी करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे तसेच मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेची विद्यार्थिनी आरुषी उस्तुरगे हिने ९९.६० टक्के गुण मिळवून सोलापुरात प्रथम क्रमांक पटकावला. तर यशराज भोसले याने ९९ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शहरभर शाळेचे कौतुक होत आहे. आरुषीने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाला दिले. यंदा एकूण १२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर...

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात.

Image
प्रतिनिधी -सोलापूर,  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.   या  प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते तसेच डॉ. सूर्यप्रकाश कोटे मंडळाचे प्रमुख विनोद दादा वाघमारे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा संपन्न होऊन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.मिरवणुकीदरम्यान तथागत गौतम बुद्ध यांचा देखावा सादर करण्यात आला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंडळातील कार्यकर्ते, सभासद आणि महिला मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.   या  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे उत्सव अध्यक्ष कृष्णा कांबळे, उपाध्यक्ष गणेश लोंढे व सनी खळसुडे, कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, सचिव स्वप्निल सुरवशे, खजिनदार विशाल गायकवाड तसेच मिरवणूक प्रमुख उदय वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विश्वजीत कसबे, उत्तरेश्वर वाघमारे, नितीन व...

सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सप्तर्षी हावळे हिचे 10वी CBSE परीक्षेत 90% गुणांसह यश.

Image
प्रतिनिधी -सोलापूर CBSE बोर्ड परीक्षा 2026 मध्ये सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी कु. सप्तर्षी साजन हावळे हिने 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय 90% गुण मिळवत शाळा व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशस्वी कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सप्तर्षीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे आई-वडील, शिक्षक तसेच संस्थेकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात ती आणखी मोठी यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ------------------------------------- जनता संघर्ष न्यूज,सोलापूर  संपादक -सिद्धार्थ भडकुंबे  बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

भीम आज्ञा संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

Image
सोलापूर (प्रतिनिधी) : हाबू वस्ती, जुना देगाव नाका येथे भीम आज्ञा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने भारत शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे आधारस्तंभ भारत शिरसागर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पअर्पण व मेणबत्ती प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भीम बांधवांना भारत शिरसागर यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अतुल प्रक्षाळे, तसेच योगेश उघडे, आदर्श उघडे यांच्यासह बहुसंख्य भीम सैनिक व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जि. प. शाळा अंत्रोळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Image
अंत्रोळी (प्रतिनिधी)  जि. प. शाळा अंत्रोळी येथे विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव, परमपूज्य, बोधिसत्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी तसेच शिक्षक श्रीरंग बनसोडे सर आणि कीर्ती जाधव मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपल्या भाषणातून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. भीमगीते, नृत्यविष्कार आणि इतर सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड, श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ अंत्रोळीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे, सदस्य विक्रम जाधव, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ म्हमाने सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीनाक्...

लिपिक वर्गीय संघटना (615) राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक सोलापूर येथे संपन्न; जिल्हाध्यक्षपदी अविनाश गोडसे यांची निवड

Image
प्रतिनिधी -सोलापूर, दि. 12 एप्रिल 2026 महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक सोलापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद लिपिकांच्या पदोन्नती टप्प्यांमध्ये कपात करून वर्ग-१ पर्यंतचे वेतन मिळवून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर व राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी उपस्थित होते. राज्याध्यक्ष बाबर यांनी लिपिकांच्या वेतनत्रुटीचा मुद्दा उपस्थित करत पदोन्नती टप्पे कमी करण्याची गरज स्पष्ट केली. लिपिकांनी आपल्या पदांची तुलना तांत्रिक संवर्गाशी न करता राज्य शासनातील लिपिकांशी करावी, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हा परिषद लिपिकांसाठी चार टप्प्यांऐवजी दोन टप्पे करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मा. आमदार सत्यजितभाऊ देशमुख यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देताना, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव पुढे सरकत असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे लिपिकांना वेतनश्रेणीच...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे १७ एप्रिल रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन

Image
मुंबई : प्रतिनिधी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या माहितीनुसार, संचमान्यता, शालार्थ प्रणाली, नियमित वेतन, थकीत वेतन देयके, वरिष्ठ निवड वेतनश्रेणी तसेच पेन्शन आदी विविध बाबींमध्ये शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून निधी मंजूर होऊनही थकीत वेतनाची बिले मंजूर न करता निधी परत पाठवण्यात आल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कामकाजाबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून, कामे वेळेत होत नसल्याची तक्रार आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून सध्याचे उपसंचालक निर्णय घेण्यात निष्क्रिय असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे यांनी सांगितले की, ...

उत्तर सोलापूरात सामाजिक समतेचा प्रभावी संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत  सौ संस्कृती राम सातपुते सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संकल्पनेतून सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा SVCS बीएड कॉलेज, उत्तर सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धा तालुक्याचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग व गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. कार्यक्रमास उत्तर सोलापूर तालुक्याचे सभापती तेजस्विनी बोराडे, अमोल बोराडे,शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार,विस्ताराधिकारी सोमनाथ शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.*सदर कार्यक्रमासाठी  SVCS हायस्कूल ब्रह्मठ होटगी या संस्थेचे सचिव मा. मुख्यकार्यकारी एस स्वामी साहेब ,प्राचार्य, शिक्षक वृंद व परिचर वर्ग या सर्वांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या यशासाठी बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, डोणगाव क...

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची गर्दी; विविध सेवा उपक्रमांचे आयोजन-चेअरमन महेश क. इंगळे

Image
 प्रतिनिधी-अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट नगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान च्या वतीने भक्तांसाठी विविध सुविधा व उपक्रम राबविण्यात येत आहेत. देवस्थानचे चेअरमन महेश क. इंगळे यांनी स्वामी भक्तांना अक्कलकोट येथे दर्शनासाठी येण्याचे आवाहन करत सर्वांचे हार्दिक स्वागत केले आहे.देवस्थानतर्फे श्री वटवृक्ष मंदिरात वातानुकूलित गाभारा व मंडप, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, तसेच भक्तांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रुग्णसेवेसाठी रुग्णालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय व विद्यार्थी वस्तीगृह, तसेच बालकांसाठी शिशू विकास मंदिर यांचा समावेश आहे. याशिवाय श्री राम मंदिर, श्री मुरलीधर मंदिर व श्री विठ्ठल मंदिर येथे भक्तांसाठी निवास व दर्शनरांगेची सोय करण्यात आली आहे. वर्षभर सण-उत्सवांच्या काळात प्रसाद वाटप, तसेच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व सेवेकऱ्यांना दैनंदिन भोजन प्रसादाची मोफत सुविधा उपलब्ध...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Image
  प्रतिनिधी -सोलापूर   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंगळवार, 14 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आवारातील संविधान कोनशिलेला सकाळी 10 वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात भीम शाहिर संदीप शिंदे प्रबोधन मंच, सोलापूर यांच्या वतीने भीमगीत गायन व ‘समता रजनी’ कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात संविधान उद्देशिका वाचनासह डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर निलेश विमल धायरकर (पुणे) यांचे ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे.यावेळी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, कृषि व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप ...

प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेत श्रोते मंत्रमुग्ध

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट               श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील दहावे पुष्प आज मुंबई येथील शास्त्रीय गायक प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेने संपन्न झाले.  वटवृक्ष स्वामी मंदिरात गायन सेवा सादर करताना प्रथमेश लघाटे व सहकारी. आयडिया सा रे ग म फेम प्रथमेश लघाटे व सहकलाकारांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात जय जय रामकृष्ण हरी, निशंक हो निर्भय हो मनारे हे स्वामी समर्थांचे तारकमंत्र, दत्त माझी माता- दत्त माझा पीता, इंद्रायणीकाठी लागली समाधी ज्ञानेशाची, हि संतांची अभंग व शास्त्रीय गायन समिश्र रागातून गाऊन श्रोत्यांकडून टाळ्यांची दाद मिळविली. तसेच निघालो घेऊन दत्ताची पालखी, लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा, अशी भावगीतं भाग्यश्री रागातून गायली. त्यानंतर भूप रागातून कट्यार काळजात घुसली, अशी नाट्यपदही सादर केली. गवळण भक्तिगीतं आणि लोकगीतांचीही मेजवानी उपस्थित स्वामी भक्तांना दिली. शेवटी स्वामी कृपा कधी करणार हे गीत भैरवी रागातून गाऊन कार्यक्रमाची गोड सांगता केली. सर्वच गीतां...

स्वामी दर्शन घेतल्याने मनाला नवचैतन्य प्राप्त झाले - न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे

Image
न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, न्यायाधीश एन.ए.एल.शेख व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी -अक्कलकोट            येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेता आल्याने मनाला नवचैतन्य प्राप्त झाले असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येऊन श्री स्वामी समर्थांचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे बोलत होते. पुढे बोलताना न्यायमुर्ती शिंदे यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची दर्शन व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आहे.श्री स्वामी समर्थांचे दर्शन व मंदीर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले मनोगत. या...

नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे-प्रा. डॉ विजय माकणीकर

Image
प्रतिनिधी -सोलापूर    लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे त्यांचे स्वातंत्र्य ही भिन्न आहे. प्रत्येकाचे प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये दिसले पाहिजे.असे मत प्रा. डॉ. विजय माकणीकर यांनी व्यक्त केले. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीने आयोजित केलेल्या बौद्धिक व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी प्रा. एम. आर. कांबळे,प्रशांत गायकवाड,दत्ता थोरे,प्रा. डॉ. सुहास उघडे, यशोदीप आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.     पुढे ते म्हणाले की, नोकरशाहीचे लोकशाहीकरण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. यासाठी संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे. लोकसंख्येनुसार प्रत्येकाला प्रतिनिधित्व द्यावे लागेल तरच वंचित समूहामध्ये बंधुभाव निर्माण होईल.   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निजामुद्दीन शेख यांनी भूषविले अध्यक्ष आढाव्यात त्यांनी संविधानाची आवश्यकता संविधानाचे काटेकोर पालन करणे किती महत्त्वाचे आहे. याबद्दल आपले मत मांडले. यावेळी इम्तियाज शेख, प्रशांत बाबर,मनीष गडदे,युवराज माने,संजय रणदिवे आदी उपस्थित होते.     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष...

संविधानाच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज – पाटील

Image
सोलापूर : प्रतिनिधी संविधान हा देशाचा आत्मा असून त्याच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शंकर पाटील यांनी केले. धर्मकेंद्रित राजकारणामुळे संविधानिक मूल्यांना धोका निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वसुंधरा महाविद्यालयात आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘जातविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना : महात्मा बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान’ या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.महात्मा बसवण्णा यांनी १२ व्या शतकात समतेचा संदेश देत श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. “कायकवे कैलास” या तत्त्वज्ञानातून श्रमाधिष्ठित जीवनपद्धतीचा पुरस्कार केला. मात्र आजच्या काळात कर्मकांडांचे उदात्तीकरण वाढत असून, कामापेक्षा पूजा महत्त्वाची मानणारी प्रवृत्ती बळावत असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पक्षांनी धर्मनिरपेक्ष भूमिकेशी तडजोड केल्याचेही त्यांनी नमूद...

उन्हाळ्याच्या झळांपासून विद्यार्थ्यांना दिलासा; अंत्रोळी शाळेत टोपी व चप्पल वाटप.

Image
प्रतिनिधी – अंत्रोळी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे रॉबिन हूड आर्मी या सामाजिक संस्थेच्या वतीने वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना टोपी व चप्पलांचे वाटप करण्यात आले.सदर साहित्याचे वितरण संस्थेच्या सदस्य काजळे मॅडम व हिंदुराव गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्रीरंग दिनकर बनसोडे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी रॉबिन हूड आर्मीच्या कार्याची माहिती देताना, “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, त्या भावनेतून हे कार्य अत्यंत समाजहिताचे असून इतर संस्थांनीही यापासून प्रेरणा घ्यावी,” असे मत व्यक्त केले.या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने संस्थेच्या कार्याला सलाम करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक युवराज राठोड, कीर्ती जाधव मॅडम, मीनाक्षी राठोड मॅडम, पुष्पा बनसोडे मॅडम, नागनाथ म्हमाने सर तसेच इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कीर्ती जाधव...

सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे महत्त्वाचे योगदान - नगरसेवक महेश इंगळे.

Image
महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर नगरसेवक महेश इंगळे, नगरसेवक अविनाश मडीखांबे व अन्य दिसत आहेत. स्विमिंग ग्रुपच्या वतीने जयंती निमित्त महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले मनोगत. प्रतिनिधी -अक्कलकोट दि.११/०४/२६         महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८४८ मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे सन १८७३ साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून दिला. त्यांना १८८८ मध्ये 'महात्मा' ही पदवी देण्यात आली. महात्मा या पदवीला न्याय देवून स्त्री शिक्षणाचा पाया रचत सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे महत्त्वाचे असल्याचे मनोगत येथील स्विमींग ग्रुपचे संस्थापक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले. आज येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त उत्सव साजरा...

ओंकार भजनी मंडळांचा हरिनामात रंगलेला जल्लोष; मुनीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवात भक्तिरसाची उधळण.

Image
प्रतिनिधी - सोलापूर, दि. ८ एप्रिल २०२६  श्री दिगंबर मुनीनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ओंकार भजनी मंडळांनी भावगीतांचा व हरिनामाचा जल्लोष सादर करत वातावरण भक्तिमय केले. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत रंगलेल्या हरिजागर कार्यक्रमात विविध भाषांतील सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या हरिजागरात तेलगू, मराठी, हिंदी आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये गवळण, आध्यात्मिक भावगीते, प्रबोधनपर गीते तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे संदेश देणारी गीते सादर करण्यात आली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि जयघोषाने दुमदुमून गेला. तत्पूर्वी पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत हरीजागर, काकड आरती, हरिपाठ, हरिकिर्तन, हरिपारायण व ज्ञानेश्वरी पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी ६ वाजता महाराजांची महारथी व महापूजा आयोजित करण्यात आली. रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत श्री अशोक चिट्याल महाराज यांनी ‘श्रीमद भागवत’ या विषयावर तेलगू भाषेत प्रवचन देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आनंद गुजर, विठ्ठल वल्लमदेशी, मारुती जिंदम, नर्सिंग बिलकुल,...

“एक वाढदिवस… हजारो हास्य!” अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात माणुसकीचा महाउत्सव; ५ हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’

Image
  प्रतिनिधी -सोलापूर  प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात समाजसेवेचा भव्य महाउपक्रम राबविण्यात येणार आहे. शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने तब्बल १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांचा संगम घडणार असून, “एक वाढदिवस… हजारो हास्य... माणुसकीचा महोत्सव” अशी संकल्पना प्रत्यक्षात साकार होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूरातील जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून होणार आहे. याचवेळी इतर उपक्रमांचाही प्रारंभ होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे तन्वीर शेख व राज सलगर यांनी दिली. दिवसभरात शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम राबविले जाणार असून, समाजाच्या सर्व घटकांना स्पर्श करणारी ही व्यापक मोहीम ठरणार आहे. विद्यार्थिनींसाठी २०० सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना शालेय बॅग, तसेच ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट, डिजिटल स्मार्ट बोर्ड आणि संगणक संच देण्यात येणार आहेत. स्वावलं...

कुमठ्याचे श्रीरंग दिनकर बनसोडे राज्य खो-खो निवड समितीवर

Image
कुमठे (प्रतिनिधी) : राज्यातील खो-खो क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी घटना घडली असून, कुमठे गावचे सुपुत्र श्रीरंग दिनकर बनसोडे यांची राज्य खो-खो निवड समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत सन 2026-27 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद तसेच निवड चाचणी स्पर्धांसाठी त्यांची निवड जाहीर करण्यात आली. श्रीरंग बनसोडे हे सध्या जि. प. शाळा अंत्रोळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून, सोलापूर खो-खो असोसिएशनचे खजिनदार आणि राष्ट्रीय पंच म्हणूनही ते काम पाहत आहेत. तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना, शाखा दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष म्हणूनही ते सक्रिय आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, उपाध्यक्ष महेश गादेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके, आयुब कलबुर्गी, कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीशैल कोरे, मुख्याध्यापक युवराज राठोड यांच्यासह शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि सोलापूर खो-खो ...

सेवाकार्याचे भाग्य व सलग ६ व्यांदा नगरसेवक हा बहुमान महेश इंगळे यांच्या जीवनाला लाभलेले स्वामी कॄपेचे वरदान - मधुकर सुरवसे

Image
  नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना मधुकर सुरवसे, वनिता सुरवसे व इतर दिसत आहेत. प्रतिनिधी -अक्कलकोट  दि.०७/०४/२६  स्वामी सेवेच्या माध्यमातून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील सेवाकार्याचे भाग्य व सलग ६ व्यांदा नगरसेवक हा बहुमान महेश इंगळे यांच्या जीवनाला लाभलेले स्वामी कॄपेचे वरदान असल्याचे मनोगत गोगावचे सरपंच मधुकर सुरवसे यांनी व्यक्त केले.          आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात गायिका कनिष्का शिवपुजे यांच्या भक्ती संगीत सेवेपुर्वी  गोगावचे सरपंच मधुकर सुरवसे परिवाराच्या वतीने देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा देवस्थान मधील सेवा कार्याबद्दल व सलग ६ वेळा नगरसेवक पदी निवडून आल्याबद्दल सरपंच मधुकर सुरवसे व त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता सुरवसे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार केला. यावेळी सरपंच मधुकर सुरवसे बोलत होते. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रशांत गुरव, रमेश शिंदे सर, प्रसाद पाटील सर, बाळासाहेब कुलकर्णी, प्रा.शिवशरण अचलेर, ओंकार पा...

ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  शिवराज्यपत्र या वृत्तपत्राचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारी सर्वसामान्यांच्या व्यथा मांडत वंचित घटकांचा आवाज बुलंद करणारे पत्रकार म्हणून इकबाल शेख यांची ओळख आहे. तरुणाईलाही लाजवेल अशी धडाडीची आणि प्रामाणिक पत्रकारिता त्यांनी ‘शिवराजपत्र’ या पोर्टलच्या माध्यमातून जपली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने लेखन करत त्यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, ‘माया संदेश’चे संपादक चंदू भाऊ जाधव, वडार समाज उत्तर तालुका अध्यक्ष दशरथ नाना पवार, पत्रकार शब्बीर मणियार, रवी पवार, रमजान मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी इकबाल शेख यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

अंकुश चव्हाण यांना भारतीय लष्कराकडून प्रतिष्ठित ‘दक्षिणी कमान सरसेनापती प्रशंसा पदक’ प्रदान”

Image
प्रतिनिधी - सोलापूर,  भारतीय सशस्त्र दलांसोबत कार्य करताना दाखवलेल्या उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठा, निःस्वार्थ समर्पण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल पुणे येथील संरक्षण जनसंपर्क अधिकारी भारतीय माहिती सेवेतील अधिकारी अंकुश चव्हाण यांना प्रतिष्ठित दक्षिणी कमान चा लष्कर प्रमुख पुरस्कार  प्रदान  करून गौरविण्यात आले.  हा सन्मान दक्षिण कमांड चे सरसेनापती लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड पुणे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, सन १९८४ नंतर हा मानाचा सन्मान प्राप्त करणारे श्री. चव्हाण हे पुणे येथील पहिले नागरी संरक्षण जनसंपर्क अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या कार्यातील निष्ठा, समर्पण आणि उत्कृष्टतेची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. या सन्मानामुळे नागरी अधिकाऱ्यांच्या योगदानाची दखल घेतली जात असून, भारतीय सशस्त्र दलांसोबत प्रभावी समन्वय साधण्यात श्री. चव्हाण यांनी बजावलेली भूमिका अधोरेखित झाली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाचे ते विद्यार्थी आहेत. ते मोहोळ तालु...

सोलापूर : शिवाजी नाईट कॉलेजमध्ये पीएच.डी. कोर्स वर्कचे यशस्वी आयोजन

Image
सोलापूर, दि. १ एप्रिल — येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूरच्या इतिहास विभाग व पीएच.डी. संशोधन केंद्राच्या वतीने PET-9 विद्यार्थ्यांसाठी ९ मार्च ते २६ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाइन पीएच.डी. कोर्स वर्कचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सोलापूर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यात श्री शिवाजी महाविद्यालय (बार्शी), वसुंधरा कला महाविद्यालय (सोलापूर), सहकार महर्षी शंकरराव मोहिते महाविद्यालय (पंढरपूर) आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) यांचा सक्रिय सहभाग होता. या कोर्स वर्कदरम्यान ‘पेपर क्रमांक-२ : इन्फॉर्मेशन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (ICT) आणि रिसर्च पब्लिकेशन एथिक्स (RPE)’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत मान्यवर मार्गदर्शकांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक संशोधनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयक डॉ. युवराज सुरवसे यांनी विशेष पर...