प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेत श्रोते मंत्रमुग्ध


प्रतिनिधी -अक्कलकोट 
             श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील दहावे पुष्प आज मुंबई येथील शास्त्रीय गायक प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेने संपन्न झाले. 
वटवृक्ष स्वामी मंदिरात गायन सेवा सादर करताना प्रथमेश लघाटे व सहकारी.
आयडिया सा रे ग म फेम प्रथमेश लघाटे व सहकलाकारांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात जय जय रामकृष्ण हरी, निशंक हो निर्भय हो मनारे हे स्वामी समर्थांचे तारकमंत्र, दत्त माझी माता- दत्त माझा पीता, इंद्रायणीकाठी लागली समाधी ज्ञानेशाची, हि संतांची अभंग व शास्त्रीय गायन समिश्र रागातून गाऊन श्रोत्यांकडून टाळ्यांची दाद मिळविली. तसेच निघालो घेऊन दत्ताची पालखी, लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा, अशी भावगीतं भाग्यश्री रागातून गायली. त्यानंतर भूप रागातून कट्यार काळजात घुसली, अशी नाट्यपदही सादर केली. गवळण भक्तिगीतं आणि लोकगीतांचीही मेजवानी उपस्थित स्वामी भक्तांना दिली. शेवटी स्वामी कृपा कधी करणार हे गीत भैरवी रागातून गाऊन कार्यक्रमाची गोड सांगता केली. सर्वच गीतांनां उपस्थित स्वामी भकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास हार्मोनियमवर हर्षल काडदरे, तबला रुपेश वझे, मृदंग मिलिंद लिंगायत यांनी उत्तम प्रकारे साथ संगत केली. अनिल हर्डीकर यांनी सुंदर असे निवेदन केले. 
        कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी गायक प्रथमेश लघाटे व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री स्वामी प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी देवस्थानचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, अक्षय सरदेशमुख, संतोष देगांवकर, मनोहर 
देगांवकर, स्वामीनाथ लोणारी, संजय पाठक, डॉ.मल्लीनाथ बोधले सर, ज्योती जरीपटके, लता कुलकर्णी, दिपक 
जरीपटके, प्रसाद पाटील सर, रमेश शिंदे सर, प्रा.शिवशरण अचलेर, मयूर स्वामी,
बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार, आकाश चव्हाण, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, संजय पवार, अमर पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, श्रीमुख जगदाळे, मनोज जाधव, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे यांच्यासह असंख्य स्वामीभक्त व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून या गायन सेवा श्रवणाचा आनंद लुटला.
फोटो ओळ - वटवृक्ष स्वामी मंदिरात गायनसेवा सादर करताना प्रथमेश लघाटे व सहकारी दिसत आहेत.
प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेत श्रोते मंत्रमुग्ध
अक्कलकोट, दि. १२ (प्रतिनिधी) – श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन महोत्सवात दहावे पुष्प मुंबईचे प्रख्यात शास्त्रीय गायक प्रथमेश लघाटे यांच्या प्रभावी गायन सेवेने रंगले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित स्वामीभक्त अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
‘आयडिया सा रे ग म’ फेम प्रथमेश लघाटे यांनी सहकलाकारांसह श्री स्वामी समर्थांच्या दरबारात विविध भक्तिगीते, अभंग आणि शास्त्रीय रागांची सुरेख मैफल सादर केली. ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘निशंक हो निर्भय हो मना रे’ हा स्वामी समर्थांचा तारकमंत्र, ‘दत्त माझी माता-दत्त माझा पिता’, ‘इंद्रायणीकाठी लागली समाधी ज्ञानेशाची’ या संतवाङ्मयातील रचना त्यांनी रागदारीच्या अंगाने सादर करत श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.
त्यानंतर ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा’ ही भावगीते भाग्यश्री रागात रंगली. ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाट्यपद भूप रागात सादर करत त्यांनी रसिकांची मनं जिंकली. गवळणी, भक्तिगीते आणि लोकगीते यांचीही मेजवानी देत वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाची सांगता ‘स्वामी कृपा कधी करणार’ या गीताने भैरवी रागात गोड स्वरांत करण्यात आली.
या कार्यक्रमात हार्मोनियमवर हर्षल काडदरे, तबल्यावर रुपेश वझे, तर मृदंगावर मिलिंद लिंगायत यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. अनिल हर्डीकर यांनी प्रभावी निवेदन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते गायक प्रथमेश लघाटे व सहकलाकारांचा श्री स्वामी प्रसाद व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे पदाधिकारी, मान्यवर आणि असंख्य स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या गायन सेवेचा मनमुराद आनंद लुटला.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.