Posts

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम (बापू) खेलबुडे यांची निवड.

Image
प्रतिनिधी – सोलापूर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम (बापू) खेलबुडे यांची सलग तेराव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची फेरनिवड झाली.   विक्रम (बापू)खेलबुडे यांचीअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार राम हुंडारे व सिद्धार्थ भडकुंबे यांच्या वतीने बुके देऊन सत्कार करताना... रविवार,२१ सप्टेंबर रोजी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी विक्रम खेलबुडे होते. सभेत सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त मांडले व खजिनदार किरण बनसोडे यांनी वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर केला. दोन्ही अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अध्यक्षपदासाठी किरण बनसोडे यांनी विक्रम खेलबुडे यांच्या नावाची सूचना केली, तर आप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. अशा प्रकारे खेलबुडे यांनी तेराव्यांदा अध्यक्षपदावर विराजमान होत विक्रम प्रस्थापित केला. या विश्वासास पात्र राहून काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे व सहाय्यक अधिकारी अनिल ...

नाशिकमध्ये पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार कृती समितीतर्फे जाहीर निषेध.

Image
प्रतिनिधी-सोलापूर नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे आप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करजोळे, गिरमल गुरव, अस्लम नदाफ, ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख, राम हुंडारे, सिद्धार्थ भडकुंबे, अकबर शेख, विजयकुम...

गुरववाडीतील पाझर तलाव फुटण्याचा धोका सरपंचांच्या सतर्कतेमुळे टळला.

Image
गुरववाडी (ता.अक्कलकोट),  दि.१५सप्टेंबर, २०२५ मौजे गुरववाडी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुजारी शेतातील पाझर तलाव धोकादायक स्थितीत पोहोचला होता. तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती ग्रामपंचायत व तलाठी मार्फत तहसीलदार कार्यालयास देण्यात आली.तक्रार मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी समीर शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत तलाव फुटण्यास अवघे दीड फूट अंतर उरल्याचे स्पष्ट झाले. तातडीच्या उपाययोजनांतर्गत जेसीबीच्या मदतीने सांडद्वारे पाणी बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गावातील जेसीबी मालक सागर देवरमनी तसेच गावचे सरपंच व विकासरत्न म्हाळप्पा पुजारी यांच्या पुढाकाराने पाझर तलावाचा मार्ग मोकळा करण्यात आला. या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळला. याप्रसंगी सरपंच म्हाळप्पा पुजारी म्हणाले, “गावाच्या हितासाठी माझे कर्तव्य पार पाडले. वेळेवर अभियंता समीर शेख यांना कल्पना देऊन त्यांच्याशी समन्वय साधला. जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला मार्ग मोकळा करून दिला नसता, तर मोठा अपघात घडला असता.” या कारवाईत सरपंच म्हाळप्पा पुजारी, माजी सरपंच ...

एनआरएलएमच्या धर्तीवर पाणी व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नवे धोरण – जलशक्ती विभागाचे सचिव अशोक के. के. मिना

Image
नवी दिल्ली – देशभरातील पाणी व स्वच्छता तसेच पाणी गुणवत्ता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम)च्या धर्तीवर नवे धोरण राबविण्यात येणार असल्याची ग्वाही जलशक्ती विभागाचे मुख्य सचिव अशोक के. के. मिना यांनी दिली. दीनदयाळ अंत्योदय भवन (CGO कॉम्प्लेक्स) येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय पाणी व स्वच्छता कर्मचारी फेडरेशनने विविध अडचणींबाबत निवेदन देऊन चर्चा केली. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सचिव मिना यांचा सत्कार केला. यावेळी जलजीवन मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नवनीत कुमार सारस्वत, राष्ट्रीय सचिव शंकर बंडगर, कृती समितीचे उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, राजस्थानचे कोसलेंदर सिंग, बीआरसी-सीआरसी संघटनेचे विलास निकम, योगेश सुरडकर व जयंंत वर्मा उपस्थित होते. मिना म्हणाले, “पाणी व स्वच्छता क्षेत्रातील अनुभवी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्या राज्यांत अनुभवी कर्मचारी हटविण्यात आले, तेथे कामकाजावर परिणाम झाला आहे. जलजीवन मिशनची गुणवत्ता टिकविण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन धोरण राबवले जाईल.” बैठकीत देशभरात ...

कै.शंकर हणमंतु पल्लोलु यांचे दु:खद निधन

Image
 दु:खद वार्ता प्रतिनिधी -सोलापूर  कै. शंकर हणमंतु पल्लोलु यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून — मुरलीधर चौक, स्लॉटर हाऊस, वीरजवान तरुण मंडळ, सायबोळु किराणा दुकानाजवळ, लष्कर, सोलापूर — येथून निघून मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच- सिने अभिनेत्री अलका कुबल

Image
    मुरूम- प्रतिनिधी मुलांना संस्कारयुक्त बनविताना पालकांनी स्वतः आई-वडील, सासू-सासरे व वडीलधारी मंडळींचा आदर, निस्वार्थ सेवाभाव जोपासून त्यांना आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि ज्येष्ठांचा त्याग, परिश्रम व कष्ट याची जाणीव करून देणे. समाजात आपले कुटुंब अधिक सुसंस्कारित बनवून ते अधिक मजबूत व एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केले.          रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा गौरव सोहळा रत्नमाला मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. ५) रोजी आयोजित सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम कुलकर्णी होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.  यावेळी अनुसया मिरकले, वैभव वेल्हाळ, संगीता माकणे, तनुजा गाढवे, दत्ता राठोड, प्रिया वाकड...

त्रिमूर्ती गणेश मंडळ, मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा उत्साहात-पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना.

Image
प्रतिनिधी-सोलापूर दि.1सप्टेंबर, 2025 रोजी त्रिमूर्ती गणेश मंडळ मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी गणपती बप्पांच्या पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या वतीने नेताजी(भाऊ)खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते छोट्या मुला-मुलींनी सादर केलेल्या टाळवादन व नृत्यप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यानंतर श्रींची आरती संपन्न झाली. कार्यक्रमाला त्रिमूर्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------------------------------------- 🔹जनता संगर्ष न्यूज, सोलापूर  ▪️संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर.

Image
प्रतिनिधी -सोलापूर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने होटगी रोडवरील विकास नगर येथील रत्नदीप हाउसिंग सोसायटी शेजारील शाळा परिसरात घेण्यात येणार आहे. या शिबिराचा शुभारंभ सकाळी १०:३० वाजता होणार असून यात रक्त तपासणी (CBC), रक्तदाब तपासणी, मधुमेह (शुगर) तपासणी, नेत्र तपासणी आदी सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केले आहे.

श्री वटवृक्ष मंदिरामुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर - न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी.

Image
न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळे व स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती येत आहे. या प्रचितीमुळेच भाविकांचा कल स्वामी दर्शनाकडे नित्य वाढतच आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजनबद्ध दर्शनसेवा, विनम्रभावे आदरितिथ्य या सर्व आध्यात्मिक पैलुंमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र हे आज मितीस सर्वोच्च स्थानावर आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दूर पसरली असल्याचे मनोगत सोलापूरचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ईश्वर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी  यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी बोलत होते. याप्रसंगी श्रीशैल गवं...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात सातत्य-माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचे मनोगत.

Image
मा.आयुक्त पुणे महापालिका राजेंद्र भोसले यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, तहसीलदार विनायक मगर व अन्य मान्यवर. प्रतिनिधी-अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त तथा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी (IAS) आणि सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सहकुटुंब देवस्थानास भेट देण्यासाठी आले होते. दर्शनानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “अनेक वर्षांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन लाभले. हे दर्शन माझ्या व कुटुंबासाठी संस्मरणीय ठरले आहे. श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र मिळणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. एकंदरीत देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पुर्वीसारखेच सातत्य असून मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण स्तुत्य आहे.” याप्रसंगी देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाला तहसीलदार विनायक मगर, तलाठी सुहास डोईफोडे, देवस्थान सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शि...

अतिवृष्टी व पुरामुळे मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

Image
प्रतिनिधी-सोलापूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टी व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मंगळवेढा तहसीलदार सचिन लंगोटे यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात शिंदे यांनी नमूद केले की, कापूस, सोयाबीन, तुर यांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना सुसह्य व शाश्वत मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी जि. प. सदस्य अर्जुन पाटील, दामाजी कारखाना संचालक राजेंद्र चरणु पाटील, प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी रविकिरण कोळेकर, सिद्धू कोकरे, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, समाधान हाके, पद्मिनी शेट्टीयार, पंडित पाटील, सत्तार इनामदार, सचिन पाटील, संजय पाटील हवालदार, रणजीत पाटील, रवी पुजारी, सागर रणे, राजू हवालदार, प्रकाश चौगुले, अशोक मोरे, बिरुदेव कोकरे, काका पुजारी, मल्हारी पाराधे, उत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. य...

सोलापूरात पर्यटन महोत्सवाची जोरदार तयारी

Image
प्रतिनिधी -सोलापूर  जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमातून सोलापूर जिल्ह्याचे ब्रॅण्डिंग करून धार्मिक, सांस्कृतिक, कृषी आणि व्यापार क्षेत्राला नवे बळ मिळावे हा उद्देश आहे. या महोत्सवाच्या संकल्पनेला आमदार सुभाषबापू देशमुख यांनी पुढाकार देत शिवधनुष्य पेलले आहे. सोलापूर जिल्हा धार्मिक स्थळांनी समृद्ध असून अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी व सोलापूर शहरातील सिद्धेश्वर महाराज मंदिर यांसह अनेक ऐतिहासिक मंदिरे येथे आहेत. या मंदिरांचे धार्मिक पर्यटन वाढविण्याबरोबरच कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. सोलापुरी डाळिंब, शेंगा चटणी, कडक भाकरी, रेडिमेड गारमेंट्स, प्रसिद्ध सोलापुरी चादर तसेच हुरडा पार्टी या विशेष गोष्टींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. महोत्सवातील प्रमुख आकर्षणे रिल्स, माहितीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व परिसंवा...

संस्कार संजीवनी फाउंडेशनचा उपक्रम;आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप.

Image
प्रतिनिधी-सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे संस्कार संजीवनी फाउंडेशन संचालित वंचित विद्यार्थी आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन उळे गावचे उपसरपंच व सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. नेताजी भाऊ खंडागळे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. परमेश्वर काळे सर, सौ. काळे मॅडम, प्रवीण कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमामुळे आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळणार असून संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

स्वातंत्र्यदिनानिमित्त रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटकडून अन्नदान.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट शहरातील डी.एड. कॉलेजच्या पाठीमागील झोपडपट्टी परिसरात रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट तर्फे अन्नदान करण्यात आले. गरीब व गरजूंना एक वेळचे जेवण देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मागील आठ वर्षांपासून रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट शहरातील झोपडपट्टी परिसर, मंदिर परिसर, बसस्थानक, दर्गा परिसर तसेच रस्त्यावरील बेघर, भिकारी, मनोरुग्ण व इतर गरजूंना अन्न पुरविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. हॉटेल, विवाहसोहळे, वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले अन्न गोळा करून गरजूंना पोहचविण्याचे कार्य संस्था करत आहे. आजच्या अन्नदान उपक्रमाला ज्योतिबा पारखे, सोहेल फरास, रशीद खिस्तके, अशरफ गोलंदाज, मुआज शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजात सेवा, सहकार्य आणि संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.

“शिष्यवृत्ती मार्गदर्शनामुळेच मी अधिकारी – गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांचे प्रेरणादायी आवाहन”

Image
प्रतिनिधी -सोलापूर,  शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा हरीभाई देवकरण प्रशाला,येथील मुळे हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडली.ही कार्यशाळा शिक्षण विभाग उत्तर सोलापूर, नवनीत फाउंडेशन आणि सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत विविध जिल्ह्यांतील नामवंत शिक्षकांनी मार्गदर्शन केले. नामदेव ज्ञानदेव धनावडे (माचुतर,ता.महाबळेश्वर जि. सातारा) यांनी गणित विषयावर सत्र घेताना सांगितले की, “गणित हे केवळ आकडेमोड नव्हे तर तर्कशक्ती, वेग आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारे साधन आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणारे प्रश्न विचारावेत.” शामराव धोंडीबा जूनघरे (भोगवली मुरा, ता. जावळी, जि. सातारा) यांनी “बुद्धिमत्ता चाचणी” विषयावर प्रभावी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “ही चाचणी विद्यार्थ्यांच्या निरीक्षण, विश्लेषण आणि कल्पनाशक्तीचा कस पाहते. प्रश्न सोडवताना योग्य रणनीती वापरणे आणि वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.” तसेच संपत गणपत शेलार (असनी, ता. जावळी, जि. सात...

पत्रकार कृती समिती व आप्पाश्री मित्रपरिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर, दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद बागेतील प्रांगणात पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये  सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटी को-ऑपरेटिव्ह फेडरेशन संस्थेचे संचालक अभिराज भैया शिंदे, दूर्वांकुर साप्ताहिकाचे संपादक वैभव धोत्रे आणि युवा पत्रकार प्रसाद ठक्का या मान्यवरांचा शाल, टोपी, पुष्पहार घालून तसेच पेढे भरवून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. सत्कारानंतर तिन्ही मान्यवरांनी आयोजक पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. पत्रकार कृती समिती समिती व आप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा वाढदिवसानिमित्त गौरव केला जातो,अशी माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमास पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष तथा अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा आप्पासाहेब लंगोटे,दैनिक जय हो चे संपादक विजयकुमार उघडे, एमडी न्यूज ...

श्री जांबमुनी प्रशालामध्ये ‘हर घर तिरंगा’ व ‘टीबी मुक्त भारत’ जनजागृती रॅली.

Image
प्रतिनिधी -सोलापूर सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्र व श्री जांबमुनी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु तसेच मुख्याध्यापक मा.कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थ्यांनी तिरंग्याचे महत्त्व तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाबाबत घोषवाक्यांद्वारे जनजागृती केली. कार्यक्रमात PHN कविता पवार, ANM शिवकन्या सानप, अरुणोदय जंगम, कोमल सुतार, शिल्पा वानोळे, टीबी STTS मा. बगाडे, TB HV मा. सोनकांबळे मनोज तसेच सर्व आशा वर्कर्स उपस्थित होते.

‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ उपक्रमाला मुस्ती, बोरामणी, कासेगाव पंचक्रोशीतील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
प्रतिनिधी-सोलापूर कारगिल विजय दिनानिमित्त सह्याद्री फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ या उपक्रमाला बोरामणी व आसपासच्या पंचक्रोशीतील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संकलित करण्यात आल्या. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा – बक्षीहिप्परग, दोड्डी, मुळेगाव तांडा, पिंजरवाडी, बोरामणी, वडजी, वडजी तांडा, कासेगाव, उळे, संगदरी, उळेवाडी, वरळेगाव, मुस्ती – तसेच शक्ती प्राथमिक आश्रम शाळा मुळेगाव तांडा, श्रीपातराव सोनटक्के हायस्कूल तांदुळवाडी, डी.एन. गायकवाड प्रशाला बक्षीहिप्परग, अनंतराव देवकते प्रशाला वडजी, बसवेश्वर हायस्कूल मुस्ती, शारदानिकेतन विद्यालय आणि स्प्रिंगफील्ड नॅशनल स्कूल, उळे या शाळांचा उल्लेखनीय सहभाग होता. सर्व संकलित राख्या १५ व्या बटालियन ‘द मराठा लाईट इन्फंट्री’ तुकडीस सुपूर्त करण्यात आल्या असून त्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. यावेळी कर्नल जितिन थॉमस, सुभेदार संभाजी मोरे, सुभेदार उत्तम पाटील, सुभेदार संतोष कोकरे आणि सुभेदार किशोर मापारे उपस्थित होते. सह्या...

"क्षयरोग हा प्रतिबंधक उपाय व योग्य उपचाराने बरा होतो" -डॉ. पल्लोलु वाय.एच. (वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र, मनपा,सोलापूर

Image
सोलापूर - प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने मॅडम व शहर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी सिव्हिल UPHC अंतर्गत श्री जांबमुनी प्रशाला, कुमठा नाका, सोलापूर येथे क्षयरोग विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मा. कोरे सर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पल्लोलु वाय.एच. सर (वैद्यकीय अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात डॉ. पल्लोलु यांनी टीबीचे प्रकार, कारणे, प्रसाराची माध्यमे, लक्षणे, निदान पद्धती (जसे की थुंकी तपासणी, CB-NAAT, True-NAAT, छातीचा क्ष-किरण), तसेच DOTS उपचार पद्धती, BCG लस (बालकांसाठी, नवजात बाळांसाठी व प्रौढांसाठी), आर्थिक लाभ योजना, फूड बास्केट याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील संशयित रुग्णांना महापालिकेच्या दवाखान्यात पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ANM अरुण...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती गळोरगी येथे मोठ्या उत्साहात साजरी.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट (गळोरगी) गळोरगी येथे मातंग समाज तरुण मंडळ व ABS Group यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमेचे पूजन वहीदबाशा शेख (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुधनी) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच संतोष कौटगी यांनी केले, तर बाबू जगजिवनराम यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब पाटील (माजी तंटामुक्त अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कैलासभाऊ पाटोळे, उपाध्यक्ष महादेवभाऊ पाटोळे, चंद्रकांत प्रचडे, संतोष जमादार (ग्रामपंचायत ऑपरेटर), शंकर बनसोडे (ग्रामपंचायत सदस्य), राहुल बगले (ग्रामपंचायत कर्मचारी), चंद्रकांत अंदोडगी, ईरणा पुजारी, मोनप्पा हतरकी (युवा नेता), प्रभुलिंग बिराजदार, अजय बिराजदार, धानलिंग वाघमारे, समर्थ बनसोडे (युवा नेता), बिरप्पा अळगी, कैलास अळगी, सिद्धाराम पुजारी, सिदण्णा बिराजदार, मलकप्पा पाटोळे, गौरीशंकर बिराजदार, अविनाश बिराजदार, संतोष हरवाळकर, भ...