“जनतेसाठी सीईओंचे दरवाजे खुले!”; सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आठवड्यातून दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी कुशल जैन यांनी नागरिकाभिमुख प्रशासनाचा वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागातून विविध समस्या, तक्रारी आणि मागण्या घेऊन जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना थेट आपली बाजू मांडता यावी यासाठी त्यांनी आठवड्यातून दोन दिवस भेटीची वेळ निश्चित केली आहे.सीईओ कुशल जैन यांनी दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत नागरिकांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवली आहे. या वेळेत जिल्ह्यातील कोणताही नागरिक जिल्हा परिषद मुख्यालयात येऊन आपल्या समस्या, तक्रारी किंवा सूचना थेट सीईओंसमोर मांडू शकतो.
विशेष म्हणजे, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी त्यांनी पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धत अवलंबली आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर त्या विभागाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील तक्रारदाराला लेखी स्वरूपात कळविण्यात येतो. त्यामुळे तक्रारींच्या पाठपुराव्याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत असून प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे.गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा जनहिताशी संबंधित विषय असल्यास सीईओ कुशल जैन स्वतः त्यात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवितात. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये तक्रारींचे त्वरित निराकरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून कुशल जैन यांनी शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख कामकाजावर भर दिला आहे. प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यासोबतच नागरिकांना थेट संवादाची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न सकारात्मक मानला जात आहे.
मात्र, एका बाजूला सामान्य नागरिकांसाठी आठवड्यातून दोन दिवस भेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असताना दुसऱ्या बाजूला पत्रकार आणि प्रसारमाध्यमांशी त्यांचा संपर्क तुलनेने कमीअसल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. यामागील कारण स्पष्ट नसले तरी प्रशासनातील पारदर्शकता अधिक बळकट करण्यासाठी माध्यमांशी संवादही वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या तरी नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, तक्रारींचा पाठपुरावा करणे आणि त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही घडवून आणणे या माध्यमातून सीईओ कुशल जैन यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी त्यांनी पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धत अवलंबली आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर त्या विभागाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील तक्रारदाराला लेखी स्वरूपात कळविण्यात येतो. त्यामुळे तक्रारींच्या पाठपुराव्याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत असून प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे.गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा जनहिताशी संबंधित विषय असल्यास सीईओ कुशल जैन स्वतः त्यात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवितात. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये तक्रारींचे त्वरित निराकरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून कुशल जैन यांनी शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख कामकाजावर भर दिला आहे. प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यासोबतच नागरिकांना थेट संवादाची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न सकारात्मक मानला जात आहे.
मात्र, एका बाजूला सामान्य नागरिकांसाठी आठवड्यातून दोन दिवस भेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असताना दुसऱ्या बाजूला पत्रकार आणि प्रसारमाध्यमांशी त्यांचा संपर्क तुलनेने कमीअसल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. यामागील कारण स्पष्ट नसले तरी प्रशासनातील पारदर्शकता अधिक बळकट करण्यासाठी माध्यमांशी संवादही वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या तरी नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, तक्रारींचा पाठपुरावा करणे आणि त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही घडवून आणणे या माध्यमातून सीईओ कुशल जैन यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
----------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240