Posts

कृषीदिनानिमित्त जिल्हा परिषदेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन; १ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  कृषी विभाग, महाराष्ट्र शासन (आत्मा, सोलापूर) व कृषी विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे संपन्न होणार आहे.जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत , मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, कृषी क्षेत्रातील अधिकारी व शेतकरी बांधव मोठ...

विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने अक्कलकोट पर्यटनावर संशोधन; प्रा. मयूर स्वामी यांचा निबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रकाशित

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट,  सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट येथील प्रा.मयूर स्वामी यांचा “श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट : आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून सामाजिक-आर्थिक परिणाम आणि विकसित भारत २०४७ साठीच्या संधी” या विषयावरील संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-परिषदेत प्रकाशित झाला आहे.सर्वोदय शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, उमदी (जि. सांगली) आणि ग्लोबल फाउंडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “टुरिझम डेव्हलपमेंट इन इंडिया : प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स इन व्ह्यू ऑफ विकसित भारत २०४७” या एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत हा संशोधन निबंध सादर करण्यात आला.या संशोधनात श्री स्वामी समर्थ मंदिरामुळे अक्कलकोट परिसरात विकसित झालेल्या आध्यात्मिक पर्यटनाच्या सामाजिक व आर्थिक परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. तसेच विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध संधी, रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि शाश्वत पर्यटनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधन निबंधामुळे अक्कलकोटचे राष्ट्री...

सोलापूर पॅटर्नचा राज्यभर विस्तार; जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ कोटींचे विमा सुरक्षा कवच – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे.

Image
प्रतिनिधी -सोलापूर,  सोलापूर जिल्हा परिषदेने १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राबविलेल्या ‘सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच’ योजनेची दखल घेत राज्य सरकारने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही घोषणा करत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रप्रमुख पदस्थापना आदेश वितरण, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच करार तसेच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना नवीन वाहनांच्या चाव्या प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल...

जिल्हा परिषदेत विकास, पदोन्नती आणि कर्मचारी कल्याणाचा त्रिवेणी संगम; १३ वाहनांचे वितरण, ९८ शिक्षकांना पदोन्नती, १०,५२० कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी पॅकेज करार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सोलापूर येथे विकास, कर्मचारी कल्याण आणि प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना १३ नवीन वाहनांचे वितरण, ९८ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदोन्नतीचे आदेश तसेच १० हजार ५२० अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत अभिनव सॅलरी पॅकेज योजनेचा सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या १३ नवीन वाहनांचे लोकार्पण व वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांच्यासह विविध पंचायत समित्यांच्या सभापतींना वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी प...

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; पत्रकार कृती समिती व अपाश्री मित्र परिवारातर्फे जयंती उत्साहात साजरी.

Image
प्रतिनिधी - सोलापूर, दि. 26 जून 2026  सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 252 व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती व अपाश्री मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद परिसरातील संविधान उद्देशिकेसमोर शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार, आरक्षणाची संकल्पना आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण केले. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या विचारधारेचा पुरस्कार करत शाहू महाराजांनी समाजात समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये रुजविण्याचे महान कार्य केले. त्यांच्या प्रगतिशील विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी लतिफ नदाफ, नितीन करजोळे, ईनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, यशवंत पवार, गिर...