डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद...

डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद... प्रतिनिधी -सोलापूर सामाजिक, न्याय, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर भारतीय समाज उभा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासमोर येणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले. येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये विद्यार्थी विकास विभाग , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. दामा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस प्रा. महेश माने सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. प्रभाकर कोळेकर डॉ. केदारनाथ काळवणे डॉ. संजय गायकवाड प्राचार्य डॉ. मधुकर पवार आधीची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक डॉ. युवराज सुरवसे यांनी केले. यावेळी सपाटे म्हणाले, ...