सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी मा.कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मा.मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती.
प्रतिनिधी - सोलापूर
राज्य सरकारने तब्बल ४१(आयएएस)अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली येथील मा.कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रं-२ मा.मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने तब्बल ४१(आयएएस)अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली येथील मा.कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रं-२ मा.मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना पदभार स्वीकारून साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दिलीप स्वामी यांनाही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत.मा.दिलीप स्वामी आणि मा.मिलिंद शंभरकर या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कोरोना काळात अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले आहे.
जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरकरांना बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.तर सीईओ दिलीप स्वामी यांना अजून पोस्टिंग दिलेली नाही.पुढील आठवड्यात सोलापूर जिल्ह्याला लाभलेले दोन्ही अधिकारी नव्या ठिकाणी रुजू होतील.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240