बा... विठ्ठला राज्यातील बळी राजाला सुखी,समाधानी ठेव व महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे..! राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचे विठ्ठल चरणी साकडे.
प्रतिनिधी-पंढरपूर(जयसिंग मस्के)
दि.२९जून,२०२३ पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठठ्ल मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा पार पडली.याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या समवेत, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील,आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व अन्य मंत्री महोदय उपस्थित होते.महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी माणूस, वंचित शोषित पिडीत व्यक्तीला सुखी समाधानी ठेव..राज्यात चांगला पाऊस पडू दे..असे साकडे मुख्यमंत्री महोदय यांनी पांडुरंगाला घातले.प्रशासनाच्या वतीने पंढरपूरात,चांगले रस्ते, पाणी,शुलभशौचालय,चंद्रभागा नदी व घाटाचा परिसरात स्वच्छ करण्यात आला असून, भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन देखील वारी काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सतत लक्ष ठेवून काम करीत आहे.पंढरपूरात लाखो भाविक आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरी दाखल झाले आहेत.
-----------------------------------
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240