Posts

Showing posts from October, 2021

हुकूमशाही भाजप सरकार विरुद्ध अखिल भारतीय किसान सभेचा एल्गार...!

Image
 जनता संघर्ष न्यूज  -(प्रतिनिधी-सोलापूर) प्रतिनिधी सोलापूर : -कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचार प्रकरणानं देशाला हादरवुन सोडले आहे. या घटनेत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर शेतकरी आंदोलकांच्या अंगावर गाडी चढवून चार शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय.उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने  चार शेतकऱ्यांना चिरडून ठार मारले. या घटनेत बारापेक्षा अधिक शेतकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत.सबंध देशभरातून या अमानुष कृत्याचा जाहीर निषेध होत आहे. तशाच स्वरूपाचा निषेध सोलापूरात 'सिटू'च्या वतीने देखील करण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याच्या विरोधातील तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्...

'भव्य शेतकरी मेळावा-जागर एफ आरपी'चा...स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्कलकोट...!

Image
जनता संघर्ष न्यूज  (प्रतिनिधी :- सोलापूर) उद्या दि.८ऑक्टोबर २०२१ रोजीअक्कलकोट तालुक्यातील किणी येथे संपन्न होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्यास ऊस उत्पादकांना एक रकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शेट्टी यांनी घटस्थापनेपासून 'जागर एफआरपी' चा हे आंदोलन आराधना शक्ती स्थळापासून सुरू केलेले असून तीर्थयात्रा स्वरूपातील हा शेतकरी मेळावा दि.८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. या शेतकरी मेळाव्यास माननीय राजू शेट्टी व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर भूमिका मांडणार आहेत.एक रकमी एफआरपी देण्याचा कायदा असताना जिल्ह्यातील साखर कारखानदार तीन-तीन टप्प्यात एफ आर पी देत आहेत .जर तीन टप्प्यात कायदा झाला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची शेती करणे तोट्याची होईल, या मेळाव्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि लूट थांबविण्यासाठी सरकारकडे मागणी केली जाणार आहे किणी येथे होणाऱ्या या भव्य शेतकरी मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किणीचे उप...

भिमा-कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,महाराष्ट्र. अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहुल झळकी यांची निवड.

Image
जनता संधर्षं न्यूज नेटवर्क,पुणे -(प्रतिनिधी-सोलापूर) भिमा-कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,महाराष्ट्र.अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहुल झळकी यांची निवड. भिमाकोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,समिती महाराष्ट्र  संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्या आदेशान्वये तसेच जिल्हा अध्यक्ष संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विजय रणस्तंभाची जनजागृती स्वयंसेवक समाज्यातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत तसेच गाव-खेडोपाड्यातपर्यंत पोहचावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दि.१ऑक्टोबर २०२१ रोजी  भिमाकोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,समिती अक्कलकोट तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी राहुल शिवयोगी झळकी यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी सोलापूर शहर अध्यक्ष भागप्पा  प्रसन्न्न,जिल्हा संपर्क प्रमुख संदीप वाघमारे,आनंद कांबळे,इंद्रजित कांबळे,श्रीकांत कांबळे,लखन गौड,पंकज कांबळे,राहुल चलवादी,किरण गायकवाड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.